पोखरला जातो टेंभीचा माळ

अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने पोखरला जातो टेंभीचा माळ 

हिमायतनगर(प्रतिनिधी)महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित व स्वार्थी कारभारामुळे पांडवकालीन अबाबकरच्या माळातून सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची मोड - तोड करून जेसीबी मशीन व 15 ते 20 ट्रकच्या सहाय्याने राजरोसपणे मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. परिणामी पर्यावरणाला हानी पोंचत असून, इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हिमायतनगर शहरापासून दक्षिनेस असलेल्या टेभी, आंदेगाव, दरेसरसम, पवना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासकालीन आबाबकरचा माळ आहे. सादर माळातुन पांडवकालीन युगात माहूर गडाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला होता असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. त्यामुळे या माळाला इतिहासकालीन महत्व असून, आजही अनेक जण या माळावर पूजा - अर्चना करण्यासाठी येऊन जेवणाच्या पंगती उठवितात. मागील काळात झालेल्या मुसळधार पावसाने आजघडीला हा माळ हिरवळीने बहराला असून, विविध झाडे, फुलांच्या सुगंधाने दरवळला आहे. या ठिकाणी मागील सात वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण केलेली झाडे अस्तित्वात आहे. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांना आसरा झाला  असताना गेल्या काही वर्षांपासून येथील माळावर विनापरवाना उत्खनन करून दगड, मुरूम काढले जात आहे. परिणामी 20 ते 30 फुटापर्यंतचे मोठे खड्डे पडले आहे. गेल्या काही दिवसापासुन या ठिकाणी गौण खनिज माफियांनी धुमाकूळ माजविला असून, जेसीबी मशीनच्या साहाय्याने 15 ते 20 ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुरुमाची वाहतूक करीत आहेत. काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती कार्यरत मंडळ अधिकारी, तलाठी याना दिली असताना अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मुरूमाचे सर्रास उत्खनन करून पर्यावरणाला बाधा पोंचविली जात आहे. खरे पाहता गौण खनिज काढण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरून परवाना मिळाल्यानंतर सूर्योदय ते सूर्य मावळणार पूर्वी करावयाचे आहे. परंतु या सर्व नियमन बगल देत माळ खोदल्या जात असल्याने इतिहासकालीन अबाबकरच्या माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 

वन्य प्राण्यांच्या होतात शिकारी 
--------------------
या जंगल परिसरात असलेल्या घोरपड, ससे, हरीण, मोर लांडोर, नीळ आदींच्या शिकारी भी गौण खनिजाची करणाऱ्या तस्करांकडून केली जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन केले जात असताना सामाजिक वनीकरणासह महसूल विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. अनेकांनी गौण खनिजबाबतची माहिती तहसीलदार व मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठ्यांना दिली. यावरून दि. 25 रोजी या भागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यानी गौण खनिजाचे वाहने पकडली होती. परंतु त्यांच्यावर काय कार्यवाही झाली, किती दंड लावला हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा सायंकाळपर्यंत या भागातून मुरुमाचे उत्खनन सुरूच असल्याचे या भागातील नागरिकांनी नाव सांगण्याच्या अटीवर छायाचित्रासह आमच्या प्रतिनिधीला दिली. कार्यवाही टाळण्यासाठी मुरूम तस्करांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक देवाण घेवाण केल्याची चर्चा नागरीकातून करण्यात येत असल्याने जिलाधिकारी सुरेश काकांनी यांनी याकडे लक्ष देऊन उत्खनन केलेल्या मालाच्या ठिकाणची जायमोक्यावर पाहणी करून चौकशी करावी. आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून इतिहासकालीन अबाबकरच्या मालाचे अस्तित्व टिकवून ठेवावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी