शिक्षणासाठी विद्यार्थी संतप्त...

शाळेत जाणाऱ्या बसेस वेळेवर नसल्याने केला रास्तारोको
हिमायतनगर (प्रतिनिधी) मानव विकास मिशनच्या बसेस शाळा - कॉलेजच्या वेळेवर धावत नसल्याने सरसम येथील विद्यार्थ्यांनी आज सकाळी संतप्त होऊन हिमायतनगर कडे जाणाऱ्या बसेस रस्त्यात अडवून संताप व्यक्त केला. त्यामुळे जवळपास 2 तास नांदेड - किनवट रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

सविस्तर असे कि, हदगाव आगरकडून हिमायतनगर तालुक्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी 7 बसेस मंजूर केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात केवळ 4 ते 5 बसेस पाठविल्या जात असून, त्याही वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत शाळेत पोन्चने अवघड होत आहे. मंजूर बसेसपैकी नव्या - कोऱ्या बसेस मोठ्या शहराच्या मार्गावर वळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खताच्या बसेस पाठविल्या जात आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या वेळी बस नसल्याने तसेच सकाळच्या वेळी एकच बस येत आहे. तालुक्यातील कामारी, कामारवाडी खैरगांव, जवळगांव, वाघी, दिघी, विरसणी, कंरजी, येथील ९२ विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच सरसम येथील ४२ विद्यार्थि विद्यार्थी / विद्यार्थीनी हिमायतनगर येथील कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्या करीता हे सर्व विद्यार्थी हदगांव हिमायतनगर या महामंडळाच्या बसमधुन प्रवास करतात. परंतु कॉलेजच्या वेळात हि एकच बस धावत  आसल्याने सरसमच्या मुला -मुलीना बस मध्ये बस्नायुस्तही किंवा उभे राहण्यासाठी सुद्धा जागाच मिळत नाही. त्यामुळे सरसमसह अनेक विद्यार्थीचे शैक्षनिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सरसम बु. येथील विद्यार्थीनी आज दि.21 गुरुवारी सकाळी हदगांव हिमायतनगर बस मध्ये आम्हाला जागा द्या नसता आम्ही बस जावू देणार नाही.  असा पवित्र घेऊन महामंडळाची बस रोखून धरली तसेच आगार प्रमुखाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला . त्यामुळे सरसम बस्थानक राेडवर रस्ता राेखो झाला. तब्बल दोन तास झालेल्या या प्रकामुळे भाेकर बंदोबस्तावरुन परत येणाऱ्या ईस्लापुर, किनवट येथील पाेलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थाची समजात घातली. आणि संबंधित परिवहन अधिकारी यांच्याशी बस वाढविण्यास सांगीतले. यावरही हि समस्या न सुटल्यास उद्या येथील विध्यार्थी हदगांव - भाेकर आगरावर जॅम होऊन मागण्याचे निवेदन सादर करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ताठ परिवहन मंत्री दिवाकर रावते व विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देऊन बस अभावी विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी