पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीत
नांदेड(अनिल मादसवार)गेल्या चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून बसला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती समाधान कारक आहे. दरम्यान गोदावरी नदी व तिच्या उपनद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रीपर्यंत होता. सोमवारी थोडी उघडीप झाल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. परंतु इसापूर धरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवाका कमी असल्याने पाणी साठा कमी आहे. चुकून इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. परंतु अजूनही धरणात पाणीसाठा कमी असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग, नांदेड यांनी कळविले आहे. पैनगंगा नदी जरी धोक्याची पातळी ओलांडलेली असली तरी हे पाणी पावसाचेच असून, इसापूर धरणाचे नाही. पावसाच्या पाण्याने नदी भरून वाहत असली तरी धोका पत्करून एक शेतकरी आपल्या गुरांसह गांजेगाव बंधाऱ्याच्या पुलावरून पैलतीर गाठत पैनगंगा नदी पार करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दि.11 रोजी पाण्याचा प्रवाह वाढला असून, व्रत लिहीपर्यंत सध्यातरी बंधाऱ्याचे गेट जैसे थेच असून, पुराणे धोक्याची पातळी ओलांडली असून, कोणत्याही क्षणी पूल तुटेल अथवा बाजूने बांध फोडून पाणी निघण्याची शक्यता नाकारता येत नासल्याची माहिती सिरपल्लीचे पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी दिली.
आजघडीला पुलाच्या वरून पाणी जात असल्याने ढाणकी मार्गे विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुंटल्याने गेल्या आठ दिवसापासून एस.टी.बस बंद पडली आहे. यामुळे दळण - वळणासह जनजीवन विस्कळीत झाले असून, पुराचे पाणी वाढल्यास परिसरातील शेती व गावांना नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याचे मदनराव जाधव यांनी सांगितले.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रीपर्यंत होता. सोमवारी थोडी उघडीप झाल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. परंतु इसापूर धरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवाका कमी असल्याने पाणी साठा कमी आहे. चुकून इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. परंतु अजूनही धरणात पाणीसाठा कमी असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग, नांदेड यांनी कळविले आहे. पैनगंगा नदी जरी धोक्याची पातळी ओलांडलेली असली तरी हे पाणी पावसाचेच असून, इसापूर धरणाचे नाही. पावसाच्या पाण्याने नदी भरून वाहत असली तरी धोका पत्करून एक शेतकरी आपल्या गुरांसह गांजेगाव बंधाऱ्याच्या पुलावरून पैलतीर गाठत पैनगंगा नदी पार करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दि.11 रोजी पाण्याचा प्रवाह वाढला असून, व्रत लिहीपर्यंत सध्यातरी बंधाऱ्याचे गेट जैसे थेच असून, पुराणे धोक्याची पातळी ओलांडली असून, कोणत्याही क्षणी पूल तुटेल अथवा बाजूने बांध फोडून पाणी निघण्याची शक्यता नाकारता येत नासल्याची माहिती सिरपल्लीचे पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी दिली.
आजघडीला पुलाच्या वरून पाणी जात असल्याने ढाणकी मार्गे विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुंटल्याने गेल्या आठ दिवसापासून एस.टी.बस बंद पडली आहे. यामुळे दळण - वळणासह जनजीवन विस्कळीत झाले असून, पुराचे पाणी वाढल्यास परिसरातील शेती व गावांना नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याचे मदनराव जाधव यांनी सांगितले.