15 दिवसात जवळगाव शिवारात दुसरी मृत्यूची घटना

कुत्र्याच्या हल्लयात काळवीटाचा मृत्यू...
15 दिवसात जवळगाव शिवारात दुसरी घटना
हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे जवळगाव शिवारात 02 जुलै रोजी कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे. 15 दिवसातील ही दुसरी घटना असून, वनविभागाच्या हलगर्जी पानाबाबत वन्यप्रेमी नागरिक ताशेरे ओढत आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील जंगल वनविभागाच्या आशिर्वदाने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने वन्य प्राणी आसरा शोधण्यासाठी शेत -शिवार मानवी वस्तीकडे भटकत आहेत. याचाच फायदा घेत शिकारी व वन्य प्राण्यांचे मास तस्करी करणाऱ्या टोळ्या घेत असून, हरीण, काळवीट ससे, रोही व दुर्मिळ वन्य प्राण्यांची शिकार करण्यात येत असल्याचे मागील काळात सिरंजणी रस्त्यावर झालेल्या एका शिकाऱ्याच्या मृत्यूवरून उघड झाले आहे. तेलंगना राज्याला लागून असलेल्या पोटा, दुधड, वाळकेवाडी, टाकराळा, वाशी परिसरातील जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात झाल्याने जंगल परिसर भकास झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी सध्या उगवलेल्या शेत - शिवारातील पिकांवर ताव मारण्यासाठी रानात येत आहेत. असेच हरीण व काळवीट कळप दि.02 जुलै रोजी जवळगाव शिवारात आले होते. दरम्यान उड्या मारत पाळणाऱ्या हरणाच्या कळपातील एका काळवीचा पाय चिखलात रुतल्याने फसून बसले होते. याच संधीचा फायदा घेत गेल्या अनेक महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शिकार करताना निदर्शनास आल्याने कुत्र्यांनी हल्ला केल्याचा बेबनाव शिकारी टोळ्या करीत असल्याचा संशय वन्यप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.   

वनविभागाच्या काही अधिकारी - कर्मचाऱ्यांचा शिकारी टोळ्यासोबत छुपी युती असल्याचा आरोपही वन्य प्रेमी नागरिक करीत आहेत. त्यामुळे आज मृत्यू झालेल्या त्या काळवीटाचा मृत्यू कुत्र्याच्या हल्ल्याने की..? शिकाऱ्याच्या हल्ल्यात असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. या घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जगन पवार, वनरक्षक एस.जी.जाधव यांनी केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी धंनजय मांदळे  यांनी शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय नियमानुसार प्रेत जाळून टाकण्यात आले आहे.
      
मोकाट कुत्र्यामुळे पुन्हा एक हरिनाचा मृत्यू 

गेल्या महिन्यातील 17 जून रोजी सकाळी याचा परिसरात याच शिवारात एक हरिनाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या भागातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु अद्याप कोणतेही ठोस पाउल स्थानिक ग्रामपंचायत अथवा वन विभागाने उचलले नसल्याने 15 दिवसानंतर एका नर जातीच्या हरीण (काळविटाला) जीव गमवावा लागला असल्याचे नागरीक बोलून दाखविले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी