काल झालेल्या मुसळधार पावसाने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारा सहस्र्रकुंड धबधबा तिन्ही धारांनी ओथंबून वाहत आहे. हे निसर्गनिर्मित विहंगम दृश्य पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून येथे पोलीस चौकी उभारून पर्यटकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी जाणकार नागरीकातून व्यक्त केली जात आहे. छाया - अनिल मादसवार