पाणपोई सुरु

भीम बोईस मित्रमंडळाच्या वतीने दार्लूम चौकात पाणपोई सुरु 

हिमायतनगर(प्रतिनिधी)वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे घसा कोरडा पडून मनुष्य जीव पाणी पाणी करीत आहे. हि बाब लक्षात घेता ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी येथील भीम बोईस मित्रमंडळाचे इम्रान खान, उबेद खान, मोहम्मद अरबाज यांच्या वतीने शहरातील चौपाटी परिसरात असलेल्या दार्लूम चौकात पाणपोईची सुरुवात केली आहे. याचे उद्घाटन दि.२५ रोजी मजहर मौलाना यांच्या हस्ते करण्यात आले असून, तळपत्या उन्हातही नागरिकांची तहान भागणार आहे.

या ठिकाणी लावलेल्या बैनरवरून युवकांनी जल हि जीवन है... चा संदेश देवून अनमोल पाण्याची बचत करण्याचे आवाहनही केले. यावेळी पत्रकार फाहद खान, रियाज अहेमद, मसूद मौलाना, मोहमद अक्रम, मो.सद्दाम मोहसीन खान, मो.नदीम, निसार शेवालकर यांच्यासह अनेक युवकांची उपस्थिती होती. पाणी टंचाई लक्षात घेवून नागरिकांची तहान भागविण्यासाठी युवकांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी