प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम

गोवंश हत्या बंदी कायद्याचा आदर सर्वांनी करावा... डॉ. अरविंद गायकवाड 
हिमायतनगर(प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये गोवंश हत्या बंदी कायदा ०४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, याचा आदर सर्वांनी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग नांदेडचे सहाय्यक आयुक्त डॉ.अरविंद गायकवाड यांनी केले. 

ते दि.२३ शनिवारी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय कार्यालयात लावण्यात आलेल्या जनजागृती फलक आनावरण व शेतकर्यांना पूरक व्यवसाय प्राधान्य क्रमाने निवड केलेल्या प्रकल्पाची पाहणी कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय मादळे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जी.एम.कदम, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याची माहिती शेतकर्यांना व्हावी व पशु हत्या थांबावी याबाबतचे मार्गदर्शन व त्याची सखोल माहिती दिली जात आहे. कुठेही गोवंश विक्री, अथवा खरेदीचं उद्देशाने कोणी च्चापानी करीत असेल तर परिसरातील पशु प्रेमी नागरिकांनी प्रश्नाला याची माहिती द्यावी. तसेच जनावारंची वाढती संख्या व भाकड जनावरांच्या पालन पोषणासाठी शासन प्रयत्न करीत असून, लवकरच याबाबत ठोस उपाययोजना जाहीर झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून गोशाला उभारल्या जाणार आहेत. प्राणी राक्षांची सुधारित कायद्यातील कलम ५ अन्वये कोणताही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही गाईंची, वळूची किंवा बैलाची कत्तल करणार नाही किंवा करविणार नाही, कलम ५ अ (१) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल याची वाहतूक करण्यास प्रतिबंध, कलम ५ अ (२) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू, किंवा बैल याचं निर्यात करण्यास प्रतिबंध, कलम ५ ब अन्वये गाय, वळू , बैल यांची अन्य कोणत्याही पद्धतीने  कत्तलीसाठी विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध. कलम ५, ५ अ, ५ ब चा भंग केल्यास १० हजाराचा दंड व ५ वर्ष कारावासाची शिक्षा होणार आहे. तसेच कलम ५ क अन्वये गाय, वळू, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई, कलम ५ ड अन्वये महाराष्ट्र राज्याबाहेरील कत्तल केलेली गाय, वळू, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई, कलम ६ अन्वये अनुत्पादक म्हशी आणि म्हशींची पारडे या प्राण्यांची सक्षम पशुवैद्यकामार्फत कत्तल पूर्व तपासणी न करता कत्तल करण्यास मनाई(मान्यताप्राप्त कत्तलखान्याचे ठिकाणीच ताक्कालीस परवानगी) कलम ५(क), ५(ड), ६ चा भंग केल्यास २००० रुपये दंड व ०१ वर्ष कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली आहे.   तसेच कलम ६, कलम १० विषयी विस्तृत अशी माहिती उपस्थितांना दिली.  

त्यानंतर तालुक्यातील मौजे वारंगटाकळी, जवळगाव, मंगरूळ येथील पूरक व्यवसायासाठी निवड झालेल्या पत्रा लाभार्थ्यांच्या प्रकल्पास भेट देवून पाहणी केली आणि लाभार्थ्यांना पाकालाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी डॉ.पी.आर.लोखंडे, डॉ. पी.के.माघाडे, डॉ. के.आर.पवार, श्री गोडबोले, शेख फेरोज, सुशील शिंदे, जक्कलवाड यांच्यासह शेतकरी शिवाजी जाधव पाव्नेकर, शे.सिकंदर हि.नगर, अरविंद गणेश राठोड उमरहिरा तांडा, अनिल महादू घुले खडकी यांच्यासह अनेकांचं उपस्थिती होती.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी