भक्तीची उब ..!

ग्रामीण भागात गुलाबी थंडीत मिळतेय भक्तीची उब ..!

हिमायतनगर(वार्ताहर)दीपावलीच्या अभ्यंग स्नानाने कार्तिक शुद्ध एकादशी पासून सुरु ग्रामीण  भागात सकाळच्या रामप्रहरी काकडा आरत्यांच्या दिंड्या बरोबर महिलाही पुढे सरसावल्या आहेत. गुलाबी थंडीत भक्तीची उब मिळवीत सहभागी होत असल्याने दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत आहे.

अनादी काळापासून प्रतीवर्षी हिवाळ्यात येणाऱ्या कार्तिक शुद्ध मासारंभात काकडा दिन्यांची सुरुवात होते. तसेच कार्तिक दुवादाशीपासून तुलसी विवाहास प्रारंभ होतो. या दिवसात आरोग्य, भक्तिमय वातावरण व मन प्रसन्न राहावे या उद्देशाने भल्या पाहते अभ्यंग स्नान करून ताल मृदंगाच्या वाणीत सकाळी ५ वाजेपासून शहर व ग्रामीण परिसरात दिंड्यांच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. सध्या परिसरात बोचरी गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून, या काळात दिवसेंदिवस थंडीत वाढ होत आहे. त्याचा प्रमाणे आरोग्यासाठी लाभदायक असल्याने दिंडीत अबल वृद्धासह चिमुकले सुद्धा राधे गोविंद, गोपाल कृष्ण, श्री गणेशासह अबी देवी देवतांच्या आरत्या, भावगीते, अभंग गुणगुणत सहभागी होताना दिसत आहेत. दिवसभराची मेहनतीची कामे प्रसन्न मानाने व्हावीत या साठी हा उपक्रम चालवला जातो असे दिंडीत सामील होणार्या भक्तांचे म्हणणे आहे. सकाळच्या प्रहरी उठून आरत्यांचे तात सर्व नागरिकांच्या तुळशी वृंदावणाची पूजा व तुळशीसमोर दीपक लावण्याची हि प्रथा या काकडा आरत्यामधून जोपासली जाते. यातून आजही ग्रामीण भागातील अथांग भक्ती दिसून येते हे मात्र खरे.   
  
कार्तिक द्वादशीच्या मुहूर्तावर तुलसी विवाह प्रारंभ
-------------------------------------------------
श्री परमेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, कालीन्का मंदिर अश्या ठिकाणाहून निघालेल्या दिंड्यांचे स्वागत जवळपास सर्वच घरातील नागरिक मोठ्या भक्ती भावाने करीत असून, त्यांच्यचं उपस्थितीत तुलसी विवाह लावण्यात येत आहेत. टाळ - मृदंगाच्या गजरात पाच मंगलाष्टक व आरती म्हणून तुलसी विवाह थाटात संपन्न केला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तुलसी विवाह संपताच हिंदू - रिती रिवाजाप्रमाणे विवाह तिथीला सुरुवात होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी