हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नागेश पाटीलांची चलती
हिमायतनगर(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघ गेली १५ वर्ष शिवसेनेच्याच ताब्यात होता. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने हि जागा आपल्याकडे कायम केली. गेल्या चार - पाच वर्षात विकास कामाची नुसती जाहिरात बाजी झाली. प्रत्यक्षात विकासाची कामे कमी झाली, झालेल्यापैकी बहुतांश कामे नि निकृष्ठ झाल्याने जास्त बहुतांश मतदारात काँग्रेसच्या उमेदवार विषयी निरुत्साह दिसून येत आहे. या मतदार संघात युतीमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला त्यांच्या संघटनेच्या काळात अडगळीला टाकले. तर आघाडी मध्ये काँग्रेसने कधी राष्ट्रवादीला वर येऊ दिले नाही. युती आघाडी अशी बोंब झाली असल्याने खरी लढत शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारातच होईल असे स्पष्ट दिसून येत आहे.
त्यातच तत्कालीन आमदार तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांची नौटंकी ओळखून जनतेने कोणाला मतदान करायचे हे अगोदरच ठरविले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कदम यांच्या हातातील कमळ हे शिवसेनेच्या बाणावर परिणाम करेल असे वाटत नाही. याचाच फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे. तरी सुद्धा या मतापेक्ष जास्तीचे मते मिळविण्यासाठी शिवसैनिक कार्यकर्ते अंग झटकून एक - एक मत वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रतिक्रियेतून शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असल्याने आगामी विधानसभेचे आमदार नागेश पाटील हेच ठरतील असे सामान्य जनतेचे मत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार देशमुख हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत, तसेच बसपाचे जाकेर चाऊस हत्तीवर स्वार झाले आहेत. भारीपकडून डॉक्टर भुरके व नाईक हे दोन आदिवासी समाजचे नेते सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण आदिवासी बांधवांचे एकगठ्ठा मतदान वळले आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेसची वोट बैंक असल्याने मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. या सर्व बाबीचा विचार व सामान्य मतदारांच्या प्रतिक्रियेतून नागेश पाटील आष्टीकर हे आज घडीला विजयी उमेदवार आहेत असे म्हणण्यास वाव आहे. कारण दररोज शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आज तर मनसेचे जिल्हाप्रमुख व शाखाप्रमुख शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने शिवसेनेची वोट बैन्केचा आकडा वाढला आहे.
गत दोन दिवसापासून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांच्या काळातील जुने मतदार व त्यांच्या बद्दल आस्था असणार्यांची संख्या मोठी आहे.
त्यातच तत्कालीन आमदार तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांची नौटंकी ओळखून जनतेने कोणाला मतदान करायचे हे अगोदरच ठरविले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कदम यांच्या हातातील कमळ हे शिवसेनेच्या बाणावर परिणाम करेल असे वाटत नाही. याचाच फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे. तरी सुद्धा या मतापेक्ष जास्तीचे मते मिळविण्यासाठी शिवसैनिक कार्यकर्ते अंग झटकून एक - एक मत वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रतिक्रियेतून शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असल्याने आगामी विधानसभेचे आमदार नागेश पाटील हेच ठरतील असे सामान्य जनतेचे मत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार देशमुख हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत, तसेच बसपाचे जाकेर चाऊस हत्तीवर स्वार झाले आहेत. भारीपकडून डॉक्टर भुरके व नाईक हे दोन आदिवासी समाजचे नेते सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण आदिवासी बांधवांचे एकगठ्ठा मतदान वळले आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेसची वोट बैंक असल्याने मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. या सर्व बाबीचा विचार व सामान्य मतदारांच्या प्रतिक्रियेतून नागेश पाटील आष्टीकर हे आज घडीला विजयी उमेदवार आहेत असे म्हणण्यास वाव आहे. कारण दररोज शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आज तर मनसेचे जिल्हाप्रमुख व शाखाप्रमुख शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने शिवसेनेची वोट बैन्केचा आकडा वाढला आहे.
गत दोन दिवसापासून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांच्या काळातील जुने मतदार व त्यांच्या बद्दल आस्था असणार्यांची संख्या मोठी आहे.