अंगारक संकष्ट चतुर्थी

अंगारक संकष्ट चतुर्थीला हजारो भाविकांनी घेतले वरद विनायकाचे दर्शन 

हिमायतनगर(वार्ताहर)वर्षातून दोन वेळा मंगळवारची अंगारक संकष्ट चतुर्थीला गणेश दर्शनाला अनन्य साधारण महत्व असून, उमरखेड रस्त्यावरील पांडव कालीन तलावाच्या काठावर वसलेल्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. परंतु मंदिराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर रिमझिम पावसामुळे झालेला चिखल व दुर्गधीयुक्त वातावरणामुळे अक्षरश्या भक्तांना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. तातडीने या खडतर रस्त्याकडे विकासप्रेमी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष देऊन गणेश उत्सवापूर्वी काम मार्गी लाऊन भाविकाची समस्या सोडवावी अशी मागणी दर्शनार्थी भक्तांनी केली आहे.


शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गनिर्मित्त पांडवकालीन युगातील तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात जमा झालेले पान्यात जिवंत पांढर्या कमळाचे अस्तित्व असून, हे निसर्गरम्य वातावरण भक्तांना मोहित करते. मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे येथील निसर्ग सानुनाद्या लोप पावते कि काय अशी भीती भाविकांना लागली आहे. याच श्री कनकेश्वर तलावाच्या काठावर नवसाला पावणाऱ्या पांडव कालीन श्री वरद विनायकाचे मंदिर आहे. दर महिन्याची चतुर्थी व गणेशोत्सवाला दर्शनासाठी हजारो भाविक - भक्त गर्दी करतात. परंतु या ठिकाणी दर्शनार्थीना पाऊस व उन्हापासून बचाव करण्याची आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीच सोय नाही. विशेषतः मंदिराकडे जाणार्या शहरातील जी.प.शाळेपासूनच्या   रस्त्यावर चिखलाचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच उमरखेड रस्ता ते मंदिरापर्यंत जाणारा हा रस्ता देखील अतिशय अडचणीचा असल्याने याचे काम देखील पांदन रस्त्याच्या माध्यमातून करावे अशी मागणी केली जात आहे.

दिलेला शब्द पळणारच...आ.जवळगावकर      


मागील चार महिन्यापूर्वी आ.जवळगावकर यांनी वरद विनायक मंदिराला भेट देऊन पाहणी केली आणि तलावाचे अस्तित्व जोपासण्यासाठी व मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी अभियंत्यांना पाठून इस्टीमेट बनविण्याचे काम हाती घेण्याचे आश्वसन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास बोलताना दिले होते. परंतु याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने भक्तांना अडचणीचा सामना करवा लागत आहे, असे सांगून विचारणा केली असता माधवराव पाटील म्हणाले कि, जुने गोडाऊन ते नडव्या पर्यंतच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल, राहिला प्रश्न वरद विनायक मन्दिर सुशोभीकरणाचा तर तेही लवकरच मार्गी लागेल त्यामुळे दिलेले शब्द मी पाळणारच असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत सरपंच शिंदे यांच्याशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या कि, उद्याच या रस्त्यावरील घाण सफाईसाठी जेसीबी मशीन लाऊन सफाई करून, रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजविण्यात येतील. नंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून तातडीने रस्त्याचे काम केले जाईल अशी माहिती त्यांनी दिलि. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी