कालव्याची निर्मित्ती करा..

हिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागासातील बहुतांश गावे उर्ध्व पैनगंगा प्रकल्याच्या कामापासून वंचीत आहेत. ग्रामीण भागातील कोरडवाहू सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कामे हाती घ्यावीत अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी सिंचन विभागाकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात येणारे वटफळी, कांडली खु., कांडली बु, टाकराळा, मोरगव्हाण, वडगांव, पोटा बु. पोटा खु, पारवा बु, पारवा खु, वायवाडी, भोन्डणी तांडा, दाबदरी, सोनारी, दुधड, वाळकेवाडी, करंजी व सरसम सर्कल गाव परिसरातील कोरडवाहू जमीन
२१ व्या शतकातही सिंचनापासून दूर आहे. हिमायतनगर तालुक्यातील वरील गावांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कामे केल्यास हजारो हेक्टर शेती ओलीताखाली येउन गोर - गरीब शेतकर्यांना याचा लाभ होवुन सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच शेतकर्‍यांचे तथा राष्ट्राचे हित जोपासले जार्इल. करिता वरील गावांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कालवाच्या लाभ मिळवा. या अगोदर झालेल्या कालव्याचा चुकीच्या धोरणामुळे लाभ मिळाला नाही. ज्या जमिनींना पाण्याची आवश्यता होती अशी गावे कालव्याच्या लाभापासुन वंचित रालीलेली आहे. त्यामुळे अर्ध्याच्या वर शेतकर्‍यांना सदरील धोरणाचा फटका बसल्यामुळे त्यांच्या जमिनी आजही कोरडवाहू असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. या शेतकर्‍यांना लाभ मिळण्याच्या दृटीने वरील सिंचन कालवा निर्मित्ती बाबतचा गाभीर्‍याने विचार करुन शासन स्तरावरुन जोड कालवा निर्माण करण्याच्या दृटीकोणातुन पाऊले उचलावीत अशी मागणी एका निवेदान्द्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती सुनिलजी तटकरे, जल संपदा मंत्री महाराट्र , कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग औरंगाबांद, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक ला.क्षे.वि.ज.स.वि.औरंगाबाद, कार्यकारी अभियंता उ.पै.प्र.वि.क्र.५ हदगाव यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी