नेत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कामारीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा...
हिमायतनगर(वार्ताहर)आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मूळगावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कामारी गावाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक व पादचार्यांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
मागील अनेक वर्षापासून हदगाव रोड ते कामारी अश्या रस्त्यात खड्डेच खड्डे झाले आहे. उन्हाळ्यात खाद्यातून जाताना अनेकांना कमर लचकने, मानेची नस दबाने, यासह अन्य विकार जडले आहे. तर पावसाळ्यात येथील खड्डेमय रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यातून खड्ड्यातून मग काढताना अनेकांना घाण पाण्यात पडून विविध आजाराला बळी पडावे लागले आहे. या रोडवून पावस करणाऱ्या पद्चायान तर कुठे पाय ठेऊन चलवे हे कळायला मार्गाचा राहिला नसल्याने अल्पश्या पावसामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. या सर्व खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन धारकांना हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत असल्याचा भास होत असून, गावातील नागरिकांना बाहेगावी जाताना २१ व्या शतकात घरी वहाने असताना बाजूला ठेऊन बैलगाडीचा वापर करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल, तर काही राजकीय नेते व कायकर्ते निधी उपलब्ध करून दिल्याची बतावणी करून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. परंतु निधी दिला तर ५ वर्षा कालावधीत आलेला निधी गेला कुठ..? तर दिला नाही तर केवळ मातासाठीच या भागातील जनतेचा वापर करून घ्यायचा काय..? असा सवाल ग्रामस्थ व युवा मतदार विचारीत आहेत. या प्रकाकडे संबंधित विभाग, राजकीय नेते मंडळीनी लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील जनता बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलून दाखविली.
आम्हा कामारीकरांच नशीबच खराब हाय साहेब..गेल्या 15 वर्षात खैरगाव ते कामारी रोडची दयनीय आवस्था...रोडला पडलेले खड्डे त्यात साठलेल पाणी त्यामुळे होनारी प्रवासाची कसरत लोकांच्या जीवावर बेतायला लागली.. तरीहि प्रशासन व नेते मंडळीच्या आश्वासनाशिवाय कामारीकराला काहीच मीळत नसल्याची खंत भागवत पेटकर या युवकाने नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केली.