चारा - पाण्याची चिंता व वाढत्या महागाईने बाजारात पशूंची गर्दी
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात निर्माण झालेली चारा व पाणी टंचाई व वाढत्या महागाईमुळे शेतकर्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणून आगामी खरीप हंगाम भाड्यांच्या बैलांवर करण्याचा निश्चय केला आहे.
गात अनेक वर्षापासून तालुक्यात होत असलेली अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकी हैराण झाला आहे. एवढेचे नवे सततच्या पावसामुळे ज्वारीच्या पेऱ्यात झालेली कमतरता, आणि धुर्यावरील गवताची उगवण क्षमता कमी झाल्याने पशूना आवश्यक त्या प्रमाणात चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. एवढेच नव्हे उन्हाळ्याच्या सरते शेवटी पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एवढेच नव्हे चारा असलेल्या ठिकाणी अंध्रापादेशातील शेतकरी दाखल होऊन जादा दाम देत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांना कडबा १२ ते १५ रुपये व गवत ०९ ते १२ रुपये दराने खरेदी करणे अवघड बनले आहे. तसेच शासनाने नांदेड जिल्ह्यातील चारा तंचैच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पशूना चारा उपलब्ध करून पशुंचे पालन पोषण करणे गरीब शेतकर्यांना अवघड झाले आहे. परिणामी शेती करणे अवघड झाले असून, शेतीसाठी खर्च जास्त तर उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांनी आपल्या पशूंची बाजारात विक्री करून मोकळे होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन आठवड्यापासून शहरातील बुधवारच्या बाजारपेठेत बैल जोडी, गोरे, गाई, म्हशींची संख्या वाढली असून, आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या जनावरांच्या मालकांना मात्र या ठिकाणी सुद्धा चारा व पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
आठवडी बाजारातून ग्राम पंचायत टैक्सच्या स्वरुपात मोठी मिळकत होत असताना सुद्धा बाजारात येणाया पशूंच्या पंच्याची कसलीच सोय केली जात नसल्याची ओरड पशुपालकातून केली आहे.