जनतेची कामे करतो म्हणुनच मतदार मला निवडुन देतात - सुभाष वानखेडे
कॉग्रेसवाल्यासारखे दिल्लीला राहुन गल्लीचा कारभार पाहत नाही
हिंगोली मतदारसंघात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हदगांव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव, माहुर, किनवट असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुक 2009 लढविण्यापुर्वी दोन अडीच वर्ष आगोदरपासुन सर्व मतदारसंघ पिंजुन काढला. लोकांना भेटलो माझी शिवसेनेची स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख मा. उध्दवजी ठाकरेया नेत्यांच्या भुमिका पटवुन सांगीतल्या. सतत तीन वेळा आमदार म्हणुन जनता मला निवडुन देत असतांना कयाधु, पैनगंगा या नदयांना महापुर आल्यानंतर त्या महापुराला पाहुन अंगावर शहारे उमटायचे प्रचंड भिती वाटायची त्या महापुरात उतरुन अनेकांचे प्राण वाचविले. स्वत:च्या मरणाची भिती मनामध्ये न बाळगता पत्नीचे कुंकू पुसुन पुरामध्ये उतरलो. मतदारसंघातील जनता माझी असुन माझे कुटूंब आहे. त्या कुटूंबातील एकालाही मरु देणारनाही अशी शपथ घेवुन हाडामासाच्या शिवसैनिकांना सोबत घेवुन पुरात अडकलेल्या प्रत्येकाला बाहेर काढले अशा पध्दतीने जीवावर बेतुन मतदारसंघात काम करतो म्हणुनच जनता मला कहो दिलसे वानखेडे फिरसे म्हणुन चाहते. ही वस्तुस्थिती आहे. पक्षातील माझ्या वरिष्ठ नेत्यांना सुभाष वानखेडे ग्रांउड लेवलवर काम करतो, पब्लीकमध्ये घुसुन पक्षकार्य करतो याची चांगल्या तर्हेने जाण्ीव आहे. म्हणुन तर माझ्या उमेदवारीला डोळे झाकुन होकार देतात.
मराठवाडयात सतत तीन वेळा आमदार नंतर लगेचच एक वेळा खासदार म्हणुन निवडुन येणारा पहिलाच जनसेवक मीच असेल असे मी छातीठोकपणे सांगतो. कधीच अंगामध्ये नेतेगीरी येवु दिली नाही. नेतेपणा अंगात आणुन कधीच जॅकेट अंगात परिधान केले नाही. साधेपणाने राहतो म्हणुनच जनता जनार्धन माय-बाप मला आपल्यातील माणुस, आपल्या माणुस मला प्रथम पसंती देतात हे ही आवर्जुन सांगावेसे वाटते.महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा हदगांवची एकमेव नगरपालिका ही शिवसेना पक्षाची, एकहाती सत्ता स्थापन करणारी होती. माझ्या 20 वर्षाच्या सततच्या राजकिय कारकिर्दीत हदगांव पंचायत समितीवर सतत विस वर्षापासुन एकहाती सत्ता असुन हदगांव नगरपरिषदेवर दहा वर्ष सतत सत्ता होती.
हदगांव बाजार समिती, सेवा सोसायटया, ग्रामपंचायती आदीवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्यामुळे हीच आपल्या कार्याची पावती जनतेने मला दिली असे मला ठामपणे याप्रसंगी सांगावेसे वाटते. 1985 ते आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहुन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयात जागा करुन त्यांनी वेळोवेळी जी काही जबाबदारी आपल्यावर दिली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनाप्रमुखांचे धोरण डोळयासमोर ठेवुन समाजातील सर्वसामान्याच्या अडीअडचणींची त्यांच्या समस्यांची सोडवणुक करीत गेल्यानंतर जनता-जनार्दन शायनिंग इंडीया च्या कॉंग्रेस नेतेमंडळीना दुर लोटुन आपणास जवळचा माणुस आपला माणुस म्हणुन मला जवळ करु लागली. माझ्याशी जवळीकता साधु लागली अशा पध्दतीने मी जनतेचा जनसेवक म्हणुन जनतेची कामे करु लागलो. भ्रष्टाचारी बेरोजगारी व महागाई या कॉंग्रेसी सरकारने सर्वसामान्य जनतेला एवढया मोठया प्रमाणात वेठीस धरले की, जनता हतबल होवुन गेली आहे. मतदार बंध्-भगिनी यावेळी बदल घडवुन आणण्याच्या मनस्थितीत आहेत हे मला जागोजागीच्या प्रचंड गर्दीतील सभातुन दिसुन येत आहे.