पंचासुत्रीला अंगीकारून विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून जगावे - प्रा.राजाराम वट्टमवार
किनवट(वार्ताहर)समानता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समाजवाद, विज्ञाननिष्ठ या पंचासुत्रीला अंगीकारून विद्यार्थ्यांनी कोणताही भेदभाव न बाळगता फक्त माणूस म्हणून जगावे व इतरांना त्याचा पद्धतीने जगण्यासाठी स्वातंत्र्यात द्यावी हाच विचार राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातील विद्यार्थ्यांनी सोबत न्यावा असे आवाहन प्रा.राजाराम वट्टमवार यांनी केले. ते येथील साने गुरुजी प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सुरु असलेल्या राष्ट्री सेवा दलाच्या " विज्ञान छंद व साहस शिबिराच्या " बौद्धिक सत्रात बोलत होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त अधिकारी कडगे काका यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात विज्ञान या विषयांतर्गत दैनंदिन जीवनातील विज्ञान शिकवताना अभियंता प्रकाश ढोबळे यांनी बॉल पोईंट पेन, सोलर लैम्प, कागद, चाक, इंजिन, बल्ब, काम्पुटर अश्या शोधांची सखोल माहिती त्या शोधांचे शोधकर्ता शास्त्रज्ञ या सर्व वस्तूंची होत गेलेली प्रगती इत्यादी भरपूर माहिती दिली. संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण खेळही त्यांनी मुलांना शिकविले. दि.२२ ते २७ या कालावधीत होत असलेल्या ह्या जिल्हास्तरीय शिबिराचा हा दुसरा दिवस असून, किनवट व परिसरातील शंभर मुला - मुलीनी शिबिरात सहभाग घेतला होता.