स्वत:कडील सोयाबीन बियाणाचा

औरंगाबाद(प्रतिनिधी)यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबिनचे स्वत:जवळील जास्तीत जास्त बियाणे पेरणीकरिता वापरावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालकांनी केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक असून यामध्ये सर्वच वाण हे सरळ आहेत. त्यामुळे अशा वाणांचे बियाणे प्रत्येक वर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत वापरता येते. असे विभागीय कृषि सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात सन 2013 चे सप्टेंबर/ऑक्टोंबर महिन्यात अधिक पर्जन्यमान व आर्द्रतेमुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे. या वर्षीचे बियाणे तपासणी प्रयोगशाळेचे अहवालानुसार प्रमाणित सोयाबीन बियाणामध्ये उगवणशक्ती मध्ये नापास होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. खरीप हंगाम 2014 मध्ये या पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामार्फत पूरवठा होणारे बियाणे उपलब्ध असले तरी खरीप 2014 मध्ये सोयाबीन बियाणाची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाबीचा विचार करुन शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास शेतकऱ्याचा बियाणे खरेदीवरील खर्च कमी होऊन खात्रीशीर बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.

पेरणीपूर्वी बियाणाची उगवण क्षमता चाचणी फार गरजेची आहे. त्यावरुन चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटु शकते. उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणी करीता वापरावे. प्रती हेक्टर सोयाबीन बियाणे दर 70 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॉटरच्या सहाय्याने पेरणी करावी. बियाणे साठवणुकीचे वेळी आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के असावे. साठवलेल्या बियाणावर कोणत्याही प्रकारचा दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पोत्याची साठवणुक फार उंचीपर्यत न करता जास्तीत जास्त पाच पोत्यांची थप्पी करावी. मळणी केलेल्या बियाणाची प्लॅस्टीकच्या पोत्यामध्ये साठवणुक करु नये. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी