पद महिलांचे कारभार पुरुषांचा ; महीला सक्षमीकरण कागदोपत्रीच ?
हिमायतनगर(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुका अतिमागस असुन, या भागात सर्वच समाजातील लोक वास्तव्य करतांत त्यामुळे सध्य परिस्थीतील महीलांची संख्या राजकारणात वाढत असतांना तालुक्यातील अनेक पदावर महीला सदस्य व सरपंच, सदस्य काम पहातात. परंतु त्यांच्या भोळ्या स्वभाव व आडाणी पनाचा फायदा घेत काही नौरोबा व पुत्र स्वत:च काम पहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पदभारी महीलांच्या बोगस स्वाक्षर्या करुन स्वत:मान मिळवीत असल्याचे चित्र दिसत आहे.यावरुन पद महीलांचे कारभार पुरुषांचा अशी अवस्था झाल्याचे दिसुन येत आहे. परिणामी शासनाचा महीला सक्षमीकरण उद्देश केवळ कागदावर पुर्ण होत आहे काय? असा सवाल सर्व सामान्य नागरीकांतुन समोर येत आहे.
हिमायतनगर तालुक्यात 52 ग्रामपंचायती असुन, 6 पंचायत समीतीचे गण तर 3 जिल्हा परिषदेचे गट आहेत. यामध्ये जवळपास 55 टक्के पदावर महीलांचे वर्चस्व आहे. परंतु महीलांनी फक्त चुल आणि मुल हीच कामे पहावयाची असतात असा समज आजही ग्रामीण भागातील पांढर्या पोषाखातील पुरुषांचा आहे. शासन विविध प्रकारातुन महीलांना प्रथम प्राधान्य व संधी मिळावी या उद्दात हेतुने महीला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजघडीला विवध क्षेत्रात महीलांसाठी जागा आरक्षण करुन त्यांच्या हाती सत्ता दिली जात आहे. त्याचेच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी प्रतीभाताई पाटील ह्या महीलाच विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आज देश- विदेशात महीलांची मान उंचावली आहे. हिमायतनगर तालुक्यातील राजकीय व सामाजीक क्षेत्रात ही महीलांची संख्या वाढली असून, सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्य, तसेच पंचायत समीती व जिल्हा परिषद सदस्य पदीही महीलांचीच वर्णी लागलेली आहे. हिमायतनगर ,कामारी, सरसम बु, सावना ज, येथील प.स.व जी.प. पदे त्यांच्या हातात आहेत. मात्र ही सत्ता कागदोपत्रीच असुन, त्यांचे पतीराज व काही ठिकाणी पुत्रच चालऊन आपला रुबाब दाखवीत अधिकार गाजवीतांना दिसतात. कोनत्याही कामासाठी पदावर असलेल्या महीलांकडे जायचे असल्यास त्यांच्या पर्यंन्त लाभार्थी पोहोंचु शकत नाही त्याअगोदर त्यांचे पतीराज्यांच्याकडे जाऊनच आपले गार्हाने मांडावे लागत आहे. यामुळे सर्वसाधारण लाभार्थ्यांची पिळवणुक व महीला सक्षमीकरणावर गदा येत आहे. महीलांच्या पतीचा रोजेशाही थाट दिसु लागलस्याने प्रशासनाची यंत्रनाही चक्राऊन गेली आहे. पुर्वी शिक्षकांच्या बायकोला मास्तरीनबाई, डॉक्टराच्या बायकोला डॉक्टरीनबाई, म्हंटले जायचे मात्र आता नेमकी उलटी परिस्थीती निर्माण झाली असुन, पत्नीच्या पदाचा रुबाब पतीराज दाखवत असल्यामुळे त्यांना काय म्हणावे..? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या बाबीची महिला आयोगाने दाखल घेवून महिलांचे हक्क हिराऊन घेऊ पाहणाऱ्या पतीराजांवर कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी रास्त अपेक्षा महिला वर्गासह सामान्य जनतेतून होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात 52 ग्रामपंचायती असुन, 6 पंचायत समीतीचे गण तर 3 जिल्हा परिषदेचे गट आहेत. यामध्ये जवळपास 55 टक्के पदावर महीलांचे वर्चस्व आहे. परंतु महीलांनी फक्त चुल आणि मुल हीच कामे पहावयाची असतात असा समज आजही ग्रामीण भागातील पांढर्या पोषाखातील पुरुषांचा आहे. शासन विविध प्रकारातुन महीलांना प्रथम प्राधान्य व संधी मिळावी या उद्दात हेतुने महीला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजघडीला विवध क्षेत्रात महीलांसाठी जागा आरक्षण करुन त्यांच्या हाती सत्ता दिली जात आहे. त्याचेच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी प्रतीभाताई पाटील ह्या महीलाच विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आज देश- विदेशात महीलांची मान उंचावली आहे. हिमायतनगर तालुक्यातील राजकीय व सामाजीक क्षेत्रात ही महीलांची संख्या वाढली असून, सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्य, तसेच पंचायत समीती व जिल्हा परिषद सदस्य पदीही महीलांचीच वर्णी लागलेली आहे. हिमायतनगर ,कामारी, सरसम बु, सावना ज, येथील प.स.व जी.प. पदे त्यांच्या हातात आहेत. मात्र ही सत्ता कागदोपत्रीच असुन, त्यांचे पतीराज व काही ठिकाणी पुत्रच चालऊन आपला रुबाब दाखवीत अधिकार गाजवीतांना दिसतात. कोनत्याही कामासाठी पदावर असलेल्या महीलांकडे जायचे असल्यास त्यांच्या पर्यंन्त लाभार्थी पोहोंचु शकत नाही त्याअगोदर त्यांचे पतीराज्यांच्याकडे जाऊनच आपले गार्हाने मांडावे लागत आहे. यामुळे सर्वसाधारण लाभार्थ्यांची पिळवणुक व महीला सक्षमीकरणावर गदा येत आहे. महीलांच्या पतीचा रोजेशाही थाट दिसु लागलस्याने प्रशासनाची यंत्रनाही चक्राऊन गेली आहे. पुर्वी शिक्षकांच्या बायकोला मास्तरीनबाई, डॉक्टराच्या बायकोला डॉक्टरीनबाई, म्हंटले जायचे मात्र आता नेमकी उलटी परिस्थीती निर्माण झाली असुन, पत्नीच्या पदाचा रुबाब पतीराज दाखवत असल्यामुळे त्यांना काय म्हणावे..? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या बाबीची महिला आयोगाने दाखल घेवून महिलांचे हक्क हिराऊन घेऊ पाहणाऱ्या पतीराजांवर कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी रास्त अपेक्षा महिला वर्गासह सामान्य जनतेतून होत आहे.