कुपोषणमुक्तीसाठी सामाजिक सहभाग महत्वाचा - दिलीप स्वामी
हिमायतनगर(अनिल मादसवार)कुपोषणमुक्ती ही निरंतर चालणारी प्रक्रीया असून, जागतिक पातळीवर एक चिंतेचा विषय बनली आहे. कुपोषणमुक्तीची चळवळ अधिक परिणामकारक करण्यासाठी अंगणवाडी असलेल्या प्रत्येक गावात कुपोषणमक्त ग्राम समिती गठीत करण्यात येणार आहे. परंतु यात यश मिळविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येवून बालकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली तर कुपोषण मुक्तीचा लढा यशस्वी होण्यासाठी फार वेळ लागणार नाही. त्यासाठी सामाजिक सहभाग महत्वाचा असल्याचे मत अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. ............