मुंबई येथील मोदीच्या भाषणाच्या वेळी हिमायतनगरातील लाईट व केबल बंद
मोदीने नावासह उल्लेख करून काँग्रेसवर डागली तोफ
नांदेड(अनिल मादसवार)मुंबई येथे झालेल्या नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या महागर्जना सभेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीला आता ५० वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्र हा मोठा तर गुजरात छोटा भाऊ आहे. परंतु, महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, विजेचा तुटवडा, यासह अन्य राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी राज्याची अधोगती कडे वाटचाल होत असल्याचे चित्र जाहीर सभेतून मांडले. त्याच क्षणी नांदेड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने दूरध्वनिवरून भाषणाच्या वेळी आलेल्या व्यत्ययाचा आवर्जुन उल्लेख केल्याने जिल्ह्यात तो कार्यकर्ता कोण अशी एकाच चर्चा सुरु होती. .............