अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याचा संशोधकांनी केला निर्वाळा,
परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार श्री बेग यांनी केली पाहणी
हिमायतनगर(अनिल माद्सवार)अतिवृष्टीत झालेल्या पावसाने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. नांदेड न्युज लाइव्हने सतत दोन दिवसापासून वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीरतेने दखल घेऊन परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार श्री बेग यांनी दि.२२ रोजी पळसपूर परिसरातील पिकाची पाहणी करून ७० टक्के नुकसान झाल्याचे मान्य केले असून, पावसाची स्थिती अशीच राहिल्या १०० टक्के पिके जातील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सदर पिकाचे नमुने संशोधनासाठी नेण्यात आले आहे.